पहिलं विचार मंथन

ह्या वर्षी बहुतेकजण T20 प्रमाणे अल्प आणि थोडकच जीवन जगलो, हो पण ते ही महत्वाचे आहे मित्रांनो कारण सध्याचं द्योतक हेच की जीव जपला पाहिजे. प्राण वाचले पाहिजे, वेळ निभावून नेली पाहिजे बाकी मिळकत, नफा तितका नसला तरी चालेल पण जीव जपा. कोणी विचार देखील केला नसेल की असं पण कधी आपल्यावर जगायची पाळी येईल. लहानपणी सर्वांनी इतिहासाचा अभ्यास केला आहे, आपण सर्वांनी आपल्या परीने गत काळातील त्या इतिहास रचवून ठेवलेल्या व्यक्तींचे चिंतन केलं आहे. तसच त्या प्रमाणे मला वाटतं जे आपण सर्व लोक ह्या महामारीच्या काळातून तोलून सावरून बाहेर आलो आहोत, तर त्या वर पण नक्कीच खूप लिखाण, साहित्य, वाङ्मय तयार होईल. पुढील येणारी पिढी आपला हा इतिहास नक्कीच वाचेल आणि ह्यात आपलं एक वेगळं connection असं आहे की पूर्वी ज्या लोकांनी इतिहास रचला, घडवला जे सर्व ते जगले त्यांना त्यांचा इतिहास वाचायला नाही मिळाला पण आता social networking इतकं भन्नाट आहे की जे पुढे जाऊन इतिहास बनेल ते सर्वच आपण ह्या मीडिया च्या माध्यमातून पाहू शकू, पुढे पुढची पिढी वाचेल, पाहिलच पण आपण भविष्यात घडणाऱ्या आपल्या ह्या इतिहासाचं अस्तित्व आत्ताच जाणवू शकू. त्याला साक्ष बनून तो भविष्यातील इतिहास सध्या वर्तमान काळात त्याच्याशी संलग्नित राहू शकतो. असुदे वाक्य थोडं वेडं वाकडं आहे पण घ्या समजून. तर मूळ मुद्दा आहे नेटवर्क चा. आपण आपल्या बऱ्याच छब्या बनवतो. सामाजिक, पारिवारिक, नैतिक, आप्त, व्यावसायिक ई. आणि त्या प्रत्येक वर्तुळात आपलं कार्यकारणी पक्की ठरलेली असते. त्यात आपण अदलाबदल नक्कीच नाही करत. जाणकार व्यावसायिक किंवा काम करणारे श्रेष्ठ असं सांगतात की घरात आल्यावर बाकीचे उद्योग आणि कामं बाहेर ठेवायची आणि काम करत असताना घर घरीच ठेवायचं तरच तुमच्या कामात तुम्ही यशस्वी व्हाल. जे मला काय सम्पूर्ण समाजाला मान्यच करावं लागेल. मला आज एवढंच share करायचे की आज कोणी घरी असेल, कोणी बाहेर असेल, कोणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय करत असेल किंवा कोणी रिटायर असेल किंवा कुणी नव्या उद्योग, नोकरीच्या शोधात असेल तर त्यांनी कृपया कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून खचून जाऊ नये. सध्या समाजात egoist व्यक्तींचं प्रमाण देखील फार प्रमाणात आहे. कोणत्यातरी शुल्लक कारणावरून तंटे होत आहेत आज. पण आपण त्यात लक्ष घालू नका, प्रत्येक वेळेस आरे ला कारे हे उत्तर नसतं. सध्याची आपण ही भारताची सर्वात युवा पिढी आहोत, आपण स्वतः चांगल्या विचारांनी प्रेरित झालं पाहिजे. दुसऱ्या आपल्या जवळच्यांच्यावर देखील आपली चांगली छाप पडायला हवी आहे. आपल्याला प्रेरणा देणारे बरेच श्रेष्ठ मंडळी होऊन गेलेत त्यांना माना त्यांच्या विचारांना माना त्यांना डोक्यावर घेण्या ऐवजी त्यांच्या विचारांना डोक्यात घ्या. भारत नक्कीच अजून मजबूत आणि सशक्त होईल.
लस येईल महामारी वर उपाय बनेल पण आपल्या विचारांना सशक्त फक्त आपण बनवू शकतो त्याला कोणत्याही बाह्य लसीची गरज नाही. स्वतःला जपा, घरच्यांना जपा आणि वाचन करत रहा.

माझेविचार🙏

ता.क. - वरील शब्दात 'माझे' हा शब्द अहं अर्थी नसून तो सर्व वाचकांसाठी आहे.

Comments

Popular posts from this blog

Diwali Wishings